पाथर्डी नाथनगर परिसरात ५ ते ६ दिवसांपासून पिण्याच्या पाणी नाही ; पाणी न मिळाल्यास नगरपालिकेवर मोर्चा !
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : शहरातील नाथनगर परिसरात गेल्या ५ ते ६ दिवसांपासून पिण्याचे पाणी नळांना आले नसल्याने या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. नाथनगर नागरिकांच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे, पाथर्डी नगरपालिका प्रशासनावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नाथनगर परिसरात नागरिकांनी दिला.
नाथनगर परिसरात ५ ते ६ दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नाही. यामुळे नागरिकांना विकत पाणी टॅकरने घ्यावे लागत आहे. पिण्याच्या पाणी मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दारोदार पिण्याच्या पाण्यासाठी फिरण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. पिण्याच्या पाण्याची अडचण तांत्रिक असेल पण पाथर्डी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे या नाथनगर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने न सुटल्यास पाथर्डी नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराच नाथनगर परिसरातील नागरिकांनी दिला आहे.



