संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुरबाड – पत्रकार बाळासाहेब भालेराव यांना जिल्हा राजमाता जिजाऊ स्वाबलंबन शासकीय पुरस्कार देण्यात आला आहे.
मुरबाड तालुक्यातील गेली वीस ते पंचवीस वर्षे पत्रकारितेचे काम अगदी जोरदार करत असताना आपल्या लेखणीच्या माध्यमातून समस्या व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी समाजसेवेसाठी स्वःताला समर्पित यशवंतरायण सभागृह यशवंतराव चव्हाण सभागृह संपन्न झाला.
यावेळी प्रकल्प जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणासह अभियान संचालक छायादेवी शिसोदे. मुरबाड तालुका अभियान व्यवस्थापन गुलाब चव्हाण, अनिल राठोड, रामदास एगडे, महादु भोईर, ममता मसरुकर, ” यांच्यासह जिल्ह्यातील बचत गट महिला वर्ग उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे म्हणाले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद यांचे झालेले संपूर्ण जिल्ह्यात पसरले आहे. त्यांचे कामही खूप चांगले आहे. त्याच धर्तीवर जिल्हास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार काही बचत गटांना देण्यात आले. आदर्श पत्रकार म्हणून बाळासाहेब भालेराव यांना जिल्हास्तरीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन शासकीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. भालेराव याचे काम खूप मोलाचं आहे. त्यांनी महिला बचत गटातील विविध स्तरावर चांगले वृत्तपत्रांमध्ये लेखन केले त्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.



