👉तळमळशिवाय भगवंत नाही. यामुळे तळमळ ही भगवंत भेटीची पाहिजे : शिवलीलाताई पाटील महाराज
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- तळमळशिवाय भगवंत नाही. यामुळे तळमळ ही भगवंत भेटीची पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प.शिवलीलाताई पाटील महाराज यांनी केले
नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील गोंधळमळा येथे रेणुकामाता कन्स्ट्रकशनचे संचालक तथा युवानेते सचिन विठ्ठलराव सुसे पा. या कुटुंबाच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या रेणुकामाता मंदिराच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रेणुकामाता कन्स्ट्रकशनच्या वतीने आयोजित केलेल्या कीर्तनात शिवलीलाताई पाटील महाराज बोलत होत्या. दरम्यान कीर्तनासाठी मोठा भाविकगण उपस्थित होता.
यावेळी माजीमंञी शिवाजी कर्डीले, माजी सरपंच राम पानमळकर, समाजसेवक जालिंदर बोरूडे, युवानेते महेश झोडगे, जि.प. सदस्य शरद झोडगे, हरिभाऊ कर्डीले, सरपंच भालसिंग, श्री.दता तापकिरे, रवि कर्डीले, माणिकराव विधाते, उपसरपंच राहुल गोंधळे आदिंसह भिंगार, नागरदेवळे, बु-हाणनगरसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



